*ओबीसी विद्यार्थ्यांची लढाई ओबीसी समाजाच्या संघटनांनी,विद्यार्थ्यांनी लढली आणि लढाई जिंकली.* शासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या. 72 वसतिगृहांपैकी ओबीसी संघटनांच्या पुढाकाराने याआधी *भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर, जालना औरंगाबाद* या पाच जिल्ह्यात मुला मुलींचे स्वतंत्र अशी 10 वसतिगृहे सुरू झाली आहेत.*आज 22 जिल्ह्यातील 44 वसतिगृहे अशी एकूण 54 वसतिगृहे* सुरू झाली आहेत. काही दिवसात पुन्हा 6 वसतिगृहे सुरू होणार आहेत. आणखी 12 वसतिगृहांसाठी जागेचा शोध घेणे सुरू आहे. सध्या 6000 विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. सोबतच यावर्षी पासून 21600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळणार आहे.
ही लढाई इतक्यावरच थांबणार नाही तर *जोपर्यंत ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 7200 वसतिगृहे, पाच लाख विद्यार्थ्यांना आधार योजना आणि 500 विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू होईपर्यंत ही लढाई अशीच रस्त्यावर लढली जाईल.* ओबीसी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. हे पाहून आनंद होत आहे. आता ओबीसी झोपलेला नाही तर जागा झालेला आहे. यापुढे आपले न्यायिक हक्क मिळवण्यासाठी ओबीसी रस्त्यावर साथ देईल हीच माफक अपेक्षा.
*सोबत, कृतल आकरे, पियूष आकरे आणि वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.*
उमेश कोर्राम
मुख्य संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.