पुस्तक परिचय @pustakparichay قناة على Telegram

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय
पुस्तक परिचय - तुमची वाचनाची आवड वाढविण्यासाठी येथे चांगल्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्यात येतो.
4,666 مشترك
1,811 صورة
43 فيديو
آخر تحديث 28.02.2025 22:30

पुस्तक परिचय: मराठी साहित्याची समृद्धता

मराठी साहित्य एक अद्वितीय आणि समृद्ध परंपरा आहे जी अनेक महान लेखक, कवी, आणि कथेकारांनी निर्माण केली आहे. या साहित्याने त्याच्या वाचनकर्त्यांना एक नवीन दृष्टिकोन दिला आहे, अद्वितीय विचारांची झलक दिली आहे, आणि सामाजिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विविध विषयांवर विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. 'पुस्तक परिचय' च्या माध्यमातून, आम्ही आपल्या वाचनाची आवड वाढविण्यासाठी खास निवडक आणि चांगल्या दर्जाचे मराठी पुस्तकांची माहिती देणार आहोत. हा लेख वाचनकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक असेल, ज्यामुळे ते आपल्या वाचनाच्या प्रवासात नवीन दिशांमध्ये गेली जातील आणि मराठी साहित्याकडे एक नवीन दृष्टिकोनातून पाहू शकतील.

मराठी साहित्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती?

मराठी साहित्याची मुख्य वैशिष्ट्ये यामध्ये भाषेतील गोडवा, अभिव्यक्तीची विविधता, आणि सामाजिक विषयांची समर्पकता यांचा समावेश आहे. मराठी लेखकांनी त्यांच्या लेखनात समाजातील असमानता, राजकारण, आणि मानवी भावनांच्या गहराईच्या विषयी विचार केला आहे. त्यामुळे वाचन करणाऱ्याला जगातील वास्तवता समजून घेण्यात मदत होते.

याशिवाय, अनेक शास्त्रीय कवी आणि लेखकांनी त्यांच्या कार्यात हिंदी, संस्कृत, किंवा इंग्रजी भाषेतून प्रेरणा घेतली आहे. यामुळे, मराठी साहित्याच्या विकासाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. हे सर्व साहित्य वाचनासाठी एक समृद्ध अनुभव सादर करतात.

काय वाचनाची आवड वाढवण्यासाठी पुस्तकांचा निवड कसा करावा?

वाचनाची आवड वाढवण्यासाठी पुस्तकांचा योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. वाचनाच्या आवडीनुसार, वाचनकर्ता वेगवेगळ्या शैलींचे, लेखकांचे, आणि जनरचे पुस्तकं निवडू शकतो. उदाहरणार्थ, जर कोणाला कथेतील गूढता आवडत असेल, तर थ्रिलर किंवा रहस्यमय कथेतील पुस्तकांचा निवड करायला हवे.

यामध्ये वाचनाची आवड वाढवण्यासाठी स्थानिक ग्रंथालये आणि पुस्तक स्टोअर्समध्ये भेट देणे उपयुक्त ठरते. तिथे अनेक शिफारसी केलेली पुस्तकं आणि वाचनाची नवीन ट्रेंड देखील पाहता येत आहे.

कुठले प्रसिद्ध मराठी लेखक आहेत?

काही प्रसिद्ध मराठी लेखकांमध्ये पु. ल. देशपांडे, शं. ना. नवरे, व. पु. काळे, आणि साने गुरुजी यांचा समावेश आहे. हे लेखक त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्याच्या विकासाला मोठा योगदान दिला आहे. त्यांची कथा, लघुनिबंध, आणि निबंध या सर्वांनी वाचनप्रेमींवर ठसा ठेवला आहे.

त्यातल्या काही लेखकांनी त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातील विविध समस्या, समाजातील बदल, आणि आर्थिक असमानता याबद्दल विचारले आहे. यामुळे त्यांच्या पुस्तकांचा प्रभाव वाचनकर्त्यांवर दीर्घकाळ राहतो.

आजच्या काळात मराठी वाचनाची गरज का आहे?

आजच्या डिजिटल युगात, तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाची आदान-प्रदान कमी झालेली आहे. तरीही, वाचनाचे महत्व आजच्या काळात कमी झालेले नाही. वाचनामुळे विचारशक्तीला धार येते, आणि ज्ञानाची वाढ होते. त्याचबरोबर, वाचनामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.

मराठी वाचनामुळे सांस्कृतिक दृढता आणि ओळख जपली जाते. त्यामुळे, प्रत्येकाने मराठी पुस्तकांचे वाचन करून आपल्या सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

वाचनाचे फायदे काय आहेत?

वाचनाचे अनेक फायदे आहेत, जसे की ज्ञानाची वाढ, भाषिक कौशल्याचे सुधारणा, आणि संप्रेषण कौशल्यात प्रगती. वाचनामुळे एकाग्रता सुधारते आणि मानसिक ताण कमी केला जातो. त्यामुळे, वाचन एक समृद्ध अनुभव ठरतो.

याशिवाय, वाचनामुळे आपले विचारशक्ती विकसित होते आणि नवीन कल्पना, दृष्टिकोन, आणि अनुभव समजण्यात मदत होते. त्यामुळे, वाचनाचे महत्त्व आपल्या जीवनात मोठे आहे.

قناة पुस्तक परिचय على Telegram

पुस्तक परिचय एक अद्वितीय Telegram चॅनेल आहे ज्यात मराठीतील उत्कृष्ट पुस्तकांचा विचार केला जातो. या चॅनेलवर तुम्हाला मराठी भाषेतील जन्मेच्या पुस्तकांचा अद्वितीय परिचय मिळेल. या चॅनेलवर अनेक विभिन्न साहित्यिक क्षेत्रांमध्ये विचारलेल्या पुस्तकांची माहिती प्रस्तुत केली जाते. पुस्तक परिचय चॅनेलवर तुम्हाला कथा, कादंबरी, लोकसाहित्य, कविता, आत्मकथा, विज्ञान, आणि समाजशास्त्र या विषयांवर आधारित पुस्तकांच्या विचार मिळतील. त्याचप्रमाणे, पुस्तक परिचय चॅनेल मराठी साहित्य प्रेमी आणि वाचनाच्या दृष्टीने विस्तार करण्याचा एक सुंदर माध्यम आहे. सुद्धा तुम्हाला मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकांची माहिती मिळविण्याची संधी देते. तसेच, पुस्तक परिचय चॅनेलला सदस्यत्वात सामील होऊन, तुम्हाला उत्तम मराठी साहित्याची संपूर्ण माहिती मिळवण्याची संधी मिळतील.

أحدث منشورات पुस्तक परिचय

Post image

BHUTACHA JANMA by D.M.MIRASDAR

एक अप्रतिम विनोदी लेखकाचा , खळखळून हसवणारा कथासंग्रह म्हणजे भुताचा जन्म."दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी भुताचा जन्म हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. भुताचा जन्म हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे भुताचा जन्म. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला भूत म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, भवानीचा पक्षकार मधील मेहनती वकील नाना, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दिर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा.

28 Feb, 06:13
266
Post image

या आठवड्यातील दुसरे पुस्तक आहे रत्नाकर मतकरी यांच मराठी नाटक " अश्वमेध " 🙏

27 Feb, 06:58
393
Post image

BHUMIKANYA by ANAND YADAV

लेखकाने ‘भूमिकन्या’ हा कथासंग्रह वाचकांसमोर आणून गावात लपलेल्या वेदना सांगितल्या आहेत. किंबहुना ही त्यांनी शोषित स्त्रियांची त्यांच्या वतीने मांडलेली कैफियतही म्हणता येईल. कैफियत मांडताना सहसा तक्रारीचा सूर जास्त असतो; परंतु यादव यांनी या कथांमधून तक्रारी केलेल्या नाहीत. केवळ एक ग्रामीण सत्य परखडपणे मांडलं आहे. तेही ग्रामीण बोलीभाषेचा आधार घेत.वेदनांच्या शोधात... आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती स्वावलंबी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन तिच्या कर्तृत्वाचं आभाळ ती कितीतरी मोठ्ठं करु शकते. ती पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर त्याच्याही पुढं चार पावलं गेली आहे. केवळ शहरातच नव्हे गावाकडेही अलीकडे हे ित्र दिसतं. ती आता फक्त गृहिणी राहिलेली नाही. कर्तृत्वशालिनी झालेली आहे. तिचं व्यक्तिमत्व उत्तुंग होत चाललं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर चमकणाऱ्या स्त्रियांना पाहिलं की आपली खात्रीच होते की, स्त्री आता सोशिकतेपासून खूप दूर गेली आहे. तिचा ‘सासुरवास’ संपलाच आहे. मात्र हा आपला केवळ भ्रम आहे हे आनंद यादव यांचं ‘भूमिकन्या’ वाचल्यावर कळून येतं. खरं तर यादव यांचा ‘भूमिकन्या’ हा इथल्या भूमीवर स्वत:चं आयुष्य खडतरपणे जगणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या भावनांचा हृदयस्पर्शी आलेख मांडणारा कथासंग्रह आहे. त्यांनी उभ्या केलेल्या स्त्रिया, त्यांचं जगणं, त्यांचा प्रत्येक श्वास वाचताना वाचकाला अस्वस्थ करून जातो. दारिद्र्यात पिचलेली स्त्री, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जगू पाहणारी स्त्री, नवरा अकाली गेल्यावर कष्ट उपसणारी स्त्री, घराच्या बाहेर पतीच्या मनासारखं काही घडत नाही म्हणून घरात फुकटचा मार सहन करणारी स्त्री, मुलीचं लग्न नीट व्हावं म्हणून कष्ट करत राहणारी स्त्री, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारी स्त्री आणि पोटाची भूक शमविण्यासाठी पती देईल ते खाणारी स्त्री अशा कित्येक स्त्रियांनी यादवांना प्रचंड अस्वस्थ केले आहे. त्यांच्या जगण्याचा इतिहास समाजापुढे यावा हाच ध्यास जणू त्यांनी घेतलेला दिसतो. या कथासंग्रहात आदिजन्मातली माणसं, टक्के उडालेला मोर, लेक लग्नाची, जल्माचं सोनं झालं, पोटुसंपण, वाकळ, बायकांचा जल्म, पांद, भूक, नरमेध या कथा स्त्रीच्या सोशिकतेची परिसीमा अधोरेखित करतात. केवळ सोशिकपणाच नाही तर वर्षातून एकदा एक तसाचा का होईना पण मिळणारा नात्याचा सहवास त्यांना किती सुखावून जातो याचाही प्रत्यय वाचताना येतो. म्हणूनच ‘आदिजन्मातली माणसं’ मधली शांता भाऊबीजेच्या तासाभरानं मोहोरुन गेलेली दिसते, परंतु कित्येक वर्ष त्याच चाकोरीतनं जाणाऱ्या तिचं ते सुखही मनाला बोचत राहतं. माळरानावरच्या शिळेनं कित्येक वर्ष जशाचं तसं राहावं तसं. ‘टक्के’ उडालेला मोर मधली मुमताज मात्र वेगळ्या कारणानं आपल्याशी संवाद साधते. एक अनामिक नातं जोडल्यावर ते जेव्हा अपघाती तुटतं तेव्हा तिचं मन टाहो फोडतं. फक्त ते कुणालाच कळत नाही. कळतं तिच्या मनाला कारण तिच्या डोळ्यातले अश्रू मनाला बजावून सांगतात - ‘कुणावर जास्त माया लावू नये.’ लेखक मुमताजचं मुकेपणच बोलकं करतो. दुसऱ्या एका ‘कळी फुलतानाचे दिवस’ मध्ये तर लेखक लग्नाची झालेल्या मुलीच्या मनाचा विचार न करता केवळ वयात लग्न झालं पाहिजे म्हणून कुणाही बरोबर (मुलीला न शोभणाऱ्या) लग्न लावून देतात अशा पालकांवर प्रहार करतात. त्यांच्याबद्दलचा रागही प्रकट करतात. ‘बायकांचा जल्म’ या कथेत आक्काच्या भावना चित्रित करताना लेखक आक्काच्या जीवनाची परवड जिवंत करतो. आनंद यादव यांच्या साऱ्या कथा ग्रामीण वातावरणातल्या तिथली परिस्थिती, तिथल्या व्यक्तिरेखा घेऊन लिहिल्या गेलेल्या. आज एकविसाव्या शतकात प्रवेश करताना ग्रामीण स्त्रियांची होणारी परवड विचार करायला लावणारीच नव्हे तर क्लेशकारक आहे. 

27 Feb, 03:42
443
Post image

BHULBHULAIYA by V.P.KALE

भुलभुलैय्या हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा फॅण्टसीजचा संग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीज पैकी निवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या फॅण्टसी`च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साया व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा काळातनकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? भुलभुलैय्या मधील काही निवडक शाश्वत सत्य जी मला भावली ती खालीलप्रमाणे.....१) विजयी होण्यापेक्षा यशस्वी रीतीने झुजण्यालाही महत्व आहे. २)पराभव कबूल करायचा नसला की मनुष्य चिडतो. ३) सगळ्यांना सन्मार्ग दाखविणारा माणूस पण अंतर्यामी दुःखी असू शकतो, हे कुणाला समजत नाही. ४)विचार तरी स्वतःच्या मालकीचे असावेत. ५)दुःख, बंधने, नैराश्य, अपघात यामुळे माणसाचे पाय जमिनीवर राहतात, त्याचे माणूसपण त्यामुळे सिद्ध होते.अशी अनेक शाश्वत सत्ये वपु. नी भुलभुलैय्या ह्या त्यांच्या कथासंग्रहात सांगितली आहेत.

26 Feb, 04:22
511