पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande (@pul_deshpande)の最新投稿

पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande のテレグラム投稿

पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
2,411 人の購読者
123 枚の写真
4 本の動画
最終更新日 06.03.2025 13:38

पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande によってTelegramで共有された最新のコンテンツ

पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

03 Feb, 11:46

673

📕मराठी सुविचार संग्रह 📖
Total Pages - 89
Price - R̶s̶.̶9̶9̶.̶0̶̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)

(Limited time offer)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह.
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

26 Sep, 02:18

3,194

नवरा आणि नारळ
पु.ल.देशपांडे.
🤓

नवरा आणि नारळ
कसे निघतील ते नशीबच जाणे
असं आजी म्हणायची.
बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही.
दोन्हीही कसेही निघाले तरी
'पदरी पडले, पवित्र झाले'.
दोघांनाही देवघरात स्थान,
दोघेही पुज्य.
 
पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर
मद्रासीअण्णाच्या गादीवर
नारळ रचून ठेवलेले असायचे.
हल्ली ऑन लाईन साईटवर
सगळ्या किमतीचे नवरे
असेच रचून ठेवलेले असतात.

नारळ म्हटलं कि मला धडधडतं .
चांगला ओळखायचा कसा ?
मी उगाचच कानाजवळ नेऊन
हलवून वगैरे बघत असे.

अण्णाला कळायचं हे गि-हाईक 
नवीन आहे. तो आपली
जाड पितळी आंगठी दोन तीन
नारळावर टांग टांग वाजवून
हातात एक नारळ द्यायचा.

ये, लो ! म्हणायचा.
मी विचारायचो 'खवट' निकलेगा तो ?
तो म्हणायचा 'तुम्हारा नसीब !!'
 
आजी म्हणायची नारळ गोड निघाला
तर दडपे पोहे, सोलकढी व
खोब-याच्या वड्या आणि
काय काय !

खवट निघाला तर पाण्यात उकळून
वर तरंगणारं कच्च तेल
बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं.
कापलं, भाजलं, ओठ फुटले,
टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं,
थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं,
उत्तम घरगुती औषध.
किती उपयोगी ..
किती बहुगुणी !!

थोडक्यात काय,
नवरा काय ? नारळ काय ?
गोड निघाला तर नशीब,
खवट निघाला तर उपयोगी,
हे कोकणी तत्त्वज्ञान.
ह्याला जीवन ऐसे नांव !!

- पु ल देशपांडे

ता. क. ,,:
या मध्ये नवरा या ठिकाणी बायको लिहून ही वाचू शकता.सारखाच आनंद मिळेल!
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

03 Jul, 04:37

2,743

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.. सुनिता देशपांडे
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

03 Jul, 04:37

3,916

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
(माहेरचे नाव .सुनीता ठाकूर)

जन्म दिन ३ जुलै,१९२६.

सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला सगळ्या मराठी साहित्यप्रेमींकडून भरपूर दाद मिळाली.

*आठ आण्यात लग्न* म्हणून स्वतः सुनीता देशपांडे यांनी लिहिलेला लेख इंटरनेटवर वाचायला मिळाला. त्या मध्ये आजपर्यंत मला माहीत नसलेली गोष्ट वाचायला मिळाली,ती अशी >>

दादर माटुंगा परिसरात जावळे नावाचे गृहस्थ शाळा चालवायचे ,तिथे पु.ल. आणि सुनीताबाई दोघेही शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचे प्रेम जुळले. पुलं यांचे आधी कर्जत च्या दिवाडकरांच्या मुलीशी मोठ्या डामडौलात लग्न झाले होते ,परंतु लग्ननंतर लगेचच त्या मुलीचे मोठा ताप येऊन निधन झाले होते,त्या मुळे सुनीताबाई यांच्या आईचा या बिजवर आणि परजातीय मुलाशी लग्न करून द्यायला विरोध होता पण वडिलांनी पुढाकार घेऊन त्यांचे १२ जुन १९४६ रोजी रजिस्टर लग्न करून दिले.

पुलं सोबत विवाहबध्द होउन त्यांनी संसाराची धुरा आनंदाने व यशस्विरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले. यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'नवरा बायको' या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

या दानशूर दाम्पत्याने मिळवलेला पैसा विविध समाजोपयोगी संस्थांना भरभरून देऊन पैसे कशासाठी मिळवावेत आणि ते कसे खर्च करावेत याचा आदर्शच घालून दिला आहे.

७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

सुनीताबाई काव्यवाचन खूप छान करायच्या त्या पैकी दोन कवितांची लिंक सोबत देत आहे.

चाफ्याच्या झाडा (पद्मा गोळे यांची कविता)
https://youtu.be/i5_jgK1ggkM

तव नयनांचे दल हले ग (ब.भ.बोरकर यांची कविता)
https://youtu.be/x8td9mmlA30

सुनीता देशपांडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

03 Jul, 04:37

4,035

सुनिता ताइ देशपांडे यांनी सादर केलेली सुंदर मराठी कविता.. *जाईन दूर गावा.. *
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

21 Jun, 09:57

3,172

गोविंदरावांनी ह्या वाद्याला असं मोठेपण दिलं, जसं मोठेपण बिस्मिल्ला खाँसाहेबांनी सनईला दिलं. नाहीतर सनई देवळातल्या कुठल्या कोपऱ्यात वाजते ते माहितीही नसायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

21 Jun, 09:56

2,831

*पु.ल*
"परवाच मी एका लहान मुलाला विचारलं की तू कितवीत आहेस म्हणून तर तो, केजी-केजी असं काहीतरी म्हणाला.
म्हणजे हल्ली मुलं शाळेत वजनावर घेतात हे मला ठाऊक नव्हतं.
आमच्या वेळेस जर तसं असतं तर मी माझ्या तेव्हाच्या वजनानुसार एकदम सातवीत जाउन बसलो असतो."
*(बिगरी ते मॅट्रीक)*
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

18 Jun, 09:56

3,167

गोविंदराव टेंबेंनी हे वाद्य प्रतिष्ठेला नेऊन पोहोचवलं. ह्या वाद्यामध्ये ख्याल वाजवता येतो, नव्हे ख्याल गायल्यासारखा वाटतो, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यापूर्वी 'बाजूला टाकलेलं एक साथीचं वाद्य' अशा रितीनेच पेटीकडे पाहिलं जायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

12 Jun, 11:33

2,158

*महाराष्ट्राचे लाडके भाई*

*पु.ल.देशपांडे*.
*निधन : १२ जून,२०००*

प्रत्येक मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव म्हणजे पु.ल.देशपांडे. जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.

*कोट्या*

*मामा नावाची गंमत*

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’

*भारती मालवणकर*

पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.

*माणिक वर्मा*

माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली .‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.

*किस्से*

*गुळाचा गणपती*

पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती' त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.

*प्रतिशब्द*

मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’

*संजय उवाच*

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’

*माझ्या बंधू आणि भगिनींनो*

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.

भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.

’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’


*द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती*

तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती

*हवाई गंधर्व*

पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती.


*पु.लं चे विचार*

जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.

खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.

काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.

मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात

*भेटी आणि गाठी*
पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

12 Jun, 11:33

3,030

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात, पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे.

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते,मित्रांना नाही.

*गीतकार पु .ल.*

वायदा केला विसरू नका
संसाराच्या सारीपाटाचा
सांगते ऐका,पैशाला दोन बायका


*संगीतकार पु.ल*
पुलंनी खूप गाण्यांना अतिशय सुंदर संगीत दिलं आहे.त्या मुळे ही गाणी श्रवणीय झाली आहेत.त्यांनी संगीत दिलेली काही गाणी

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
कबीराचे विणतो शेले
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
माझे जीवन गाणे
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
शब्दावाचून कळले सारे
हसले मनी चांदणे
ही कुणी छेडिली तार

*गायक पु.ल*
पुलंनी काही गाणी देखील गायली आहेत

जा जा ग सखी जाऊन
पाखरा जा त्यजूनिया प्रेमळ शीतल छाया
बाई या पावसानं
ललना कुसुम कोमला

पु.ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता.

पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या मालतीमाधव या इमारतीमधील त्यांच्या बंद फ्लॅट मधे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. *लक्ष्मीच्या शोधात आलेल्या चोरांना बघेल तिकडे फक्त सरस्वतीचे दर्शन होत होते.त्या मुळे काहीही चोरीला गेलं नाही.रिकाम्या हातानी त्यांना परत जावे लागले.*

पु.लं.च्या अंत्य यात्रेचे थेट प्रक्षेपण सह्याद्री दूरदर्शनने केले होते .एखाद्या साहित्यिकाबाबतीत असे बहुदा प्रथमच घडले असेल.

तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पु.ल. (भाई) बद्दल काही लिहायला मिळाले हे तर माझे भाग्यच.

पुलंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०