" छञपती श्री शिवाजी महाराज " @chatrapat Telegram 频道

" छञपती श्री शिवाजी महाराज "

" छञपती श्री शिवाजी महाराज "
3,401 订阅者
4,065 张照片
116 个视频
最后更新于 16.03.2025 19:46

छञपती श्री शिवाजी महाराज: एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व

छञपती श्री शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महत्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेल्या महाराजांनी 17व्या शतकात स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रेरणादायी होते. शिवाजी महाराजांचे कार्य फक्त लढ्यांपुरते सीमित नाही, तर त्यांनी एक आधुनिक प्रशासन तंत्र विकसित केले आणि धर्म, संस्कृती व समाजाच्या सर्व अंगांचा विकास साधला. त्यांच्या विश्वासाने चालणारे अर्धसाम्राज्य, मावळ्यांची शक्ती आणि त्यांच्या छाप्यांमुळे लक्षवेधी झाले. त्यांच्या लढाईच्या धोरणांची चर्चा आजही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये केली जाते. शिवाजी महाराजांनी संरक्षणात्मक माहिती आलेली किल्ले बांधली, ज्यामुळे त्यांनी शत्रूंविरुद्ध संरक्षण साधले. त्यांच्या बेरीजमधील चातुर्याने अनेक लढायांमध्ये विजय प्राप्त केला, ज्यामुळे त्यांच्या नावाला एक आदर व स्थान प्राप्त झाले.

शिवाजी महाराजांचे मुख्य युद्ध कोणती होती?

शिवाजी महाराजांचे मुख्य युद्ध म्हणजे जिजाबाईच्या आदेशानुसार त्यांनी केलेले 'जंजिरा वास्को' युद्ध. हे युद्ध 1667 मध्ये झाले होते आणि या लढाईत त्यांनी जंजिरातील मुसलमानांच्या ताब्यातील किल्ल्याचा विजय मिळवला. शिवाजी महाराजांच्या धाडसामुळे मावळ्यांना आत्मविश्वास वाढला.

याशिवाय, 'पन्हाळा किल्ला' व 'सिंधुदुर्ग किल्ला' यांवर झालेल्या लढायांमध्येही त्यांनी आपल्या रणनीतीचा उपयोग केला, ज्यामुळे त्यांचे साम्राज्य अधिक विस्तारित झाले.

शिवाजी महाराजांनी किल्ले कसे बांधले?

शिवाजी महाराजांनी नवीन किल्ले बांधण्यास सुरुवात केली जेव्हा त्यांनी पश्चिम घाटातील दुर्गात्मक स्थानांचा अभ्यास केला. त्यांनी किल्ल्यांचे विकसन करताना भूगोल आणि सुरक्षेसमोरील आव्हाने लक्षात घेतली. 'सिंधुदुर्ग' किल्ला त्यांचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे, किल्ला समुद्राच्या किनाऱ्यावर असताना त्याने तिथेच एक मजबूत ठाणं बांधले.

त्यांनी किल्ल्यांच्या संरचनेमध्ये स्थानिक साधनांची उपयुक्तता विचारात घेतली. प्रत्येक किल्ल्याची रचना त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित होती, ज्यामुळे प्रत्येक किल्ला स्वतंत्रपणे लढाईसाठी सक्षम होता.

शिवाजी महाराजांचा लढाईतील धोरण कसे होते?

शिवाजी महाराजांचा लढाईतील धोरण हे नेहमीच लोकांवर विश्वास ठेवून तयार केले जात असे. त्यांनी आपल्या मावळ्यांचा प्रशिक्षण करण्याचा तपास केला आणि त्यांना स्वराज्याची महत्त्वाची भूमिका समजवून दिली. त्यांच्या धोरणांमध्ये गुप्तता, चतुराई आणि जलद गती हे महत्त्वाचे घटक होते.

त्यांच्या गुप्त ऑपरेशन्समुळे शत्रूंचा खर्च वाढ झाला, ज्यामुळे युद्धाच्या ठिकाणी त्यांचा विजय मिळवण्यात मदत झाली. उदाहरणार्थ, 'गड' किल्ल्यांची अचानक हल्ला करणारी तत्वे यामुळे शत्रूला धक्का बसला.

शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यांत स्वराज्याची कल्पना केली?

शिवाजी महाराजांनी 'महाभारत' व 'रामायण' यांमध्ये सांगितलेल्या आदर्श राज्या संकल्पनावर आधारित स्वराज्याची कल्पना केली. त्यांनी आपल्या राज्यात धर्म, नीतिमत्ता, आणि लोककल्याण यांचा समावेश केला. त्यांनी सहिष्णुतेवर विश्वास ठेवला आणि सर्व धर्मांना समान महत्त्व दिले.

त्यांच्या राज्यशास्त्रामुळे एक सर्वसमावेशक समाज निर्माण झाला, जिथे सर्व जाति आणि धर्मांचे लोक एकत्रीतपणे राहु शकत होते. हे स्वराज्य म्हणजे वेगळ्या समाजाच्या राष्ट्राचे रुपकारण होते.

शिवाजी महाराजांचा वारसा कसा जिवंत राहिला आहे?

शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या लढाईच्या कथेच्या माध्यमातून आणि त्यांच्या साहसी कार्याच्या चिरंतन स्मृतीद्वारे जिवंत राहिला आहे. आजही महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची मुर्त्या, स्मारकं आणि वाचनालये ठिकठिकाणी पहायला मिळतात, ज्या त्यांच्या धाडसाची आणि कर्तृत्वाची लक्षात येणारी आठवण देतात.

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या 'मराठा साम्राज्याने' पुढील अनेक शतके भारतीय इतिहासावर प्रभाव टाकला. आजच्या काळात शिवाजी महाराजांचे विचार व कार्य प्रेरणादायी ठरतात आणि त्यांची शिकवण युवकांमध्ये समजून घेण्यात येते.

" छञपती श्री शिवाजी महाराज " Telegram 频道

छञपती श्री शिवाजी महाराज नाम सुनते ही हमारे दिल में गर्व और श्रद्धा उत्पन्न होती है। इस टेलीग्राम चैनल का नाम 'chatrapat' है, जिसका मुख्य उद्देश्य है महान छञपती शिवाजी महाराज के जीवन, कार्य, और विचारों को सभी लोगों तक पहुंचाना। यह चैनल विभिन्न राजनीतिक, सामाजिक, और ऐतिहासिक जानकारी को साझा करता है ताकि आप भारतीय इतिहास के महान शूरवीर के बारे में और अधिक जानकारी प्राप्त कर सकें। यहां आप उनके वीरता, धर्म, और साहस के बारे में रोचक किस्से सुन सकते हैं और अपने जीवन से प्रेरणा ले सकते हैं। छञपती श्री शिवाजी महाराज एक ऐतिहासिक व्यक्तित्व थे जिन्होंने भारतीय इतिहास को अपनी महानता से सजाया था। उनकी साहस, वीरता, और सामर्थ्य के बारे में जानकर लोग उन्हें अपना आदर्श मानते हैं। अगर आप भी छञपती श्री शिवाजी महाराज के बारे में और अधिक जानना चाहते हैं, तो 'chatrapat' नामक टेलीग्राम चैनल को ज्वाइन करें और उनके जीवन के महत्वपूर्ण पहलुओं का अध्ययन करें। यह चैनल आपको एक नए प्रेरणास्रोत प्रदान करेगा और आपको भारतीय इतिहास के गौरवशाली पन्नों को जानने का मौका देगा।

" छञपती श्री शिवाजी महाराज " 最新帖子

Post image

औरंगजेब आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव महाराजांना झाली व त्यांनी काबुल मोहिमेवर जाण्यास नकार दिला. महाराजांनी वजीर जाफरखान व अन्य बादशाही सरदार व उमराव यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी नजराणे व काही द्रव्य व रक्कम देण्यास सुरवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/bNm2k-iijJE?feature=share
📜 १६ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांची आरमारी शक्ती!
महाराजांनी इ.स.१६५६ पासूनच मराठ्यांच्या आरमाराचा पाया रचला आणि आपले बळकट आरमार समुद्रावर उभे केले. जे महाराजांचे धोरण तेच धोरण पुढे छत्रपती शंभुराजेंनी सुरू ठेवले. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र इतिहासात उपलब्ध असून त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचा उल्लेख आढळतो.
तो असा
छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ ८५‌ गलबते, ५ माणसे, मायनाक भंडारीचा व सिद्दी संबळचा मुलगा हाताखाली आहेत. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका, ५०००‌हजार सैनिकांचे तळ, ३० ते १५० टनांची मोठी गलबते, ३ शिडांची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे. यावरून छत्रपती संभाजी महाराजांनीही राज्य कारभाराच्या सुरूवातीपासून आरमारी शक्ती सदृढ करण्याकडे भर दिला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१७३९
वसई मोहिम
पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सुरू केली.
३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.
चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ मे इ.स.१७५१
दाभाडे घराणे नजरकैदेत
सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढे ही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१८१८
इंग्रजांचा मालेगावच्या किल्ल्याला वेढा
नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातारा छत्रपती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला. जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

16 May, 05:50
10,623
Post image

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩

16 May, 05:50
10,798
Post image

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 १६ मे इ.स.१६४०
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १५६२, संवत्सर विक्रम, वार गुरुवार)

महाराज व सईबाईसाहेब यांचा विवाह !
सईबाईसाहेब व महाराजांचा पुणे येथे लालमहाली समंत्रक विवाह संपन्न. महाराजांच्या आयुष्यात सईबाईसाहेब यांना फार वेगळे स्थान होते. सईबाईसाहेब व महाराजांचा विवाह संपन्न झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/bNm2k-iijJE?feature=share

📜 १६ मे इ.स.१६४९
( जेष्ठ पौर्णिमा, शके १५७१, संवत्सर विरोधी, गुरुवार )

शहाजीराजांची सुटका :-
घोरपडे, अफझल आणि इतर सरदारांनी शहाजीराजांचे दरबारातील महत्व कमी व्हावे म्हणून खोटेनाटे आरोप करून आबासाहेब शहाजीराजेंना झोपेत अटक करवली. मात्र आजच्या दिवशी आदिल शहाने सन्मानपूर्वक आबासाहेबांची सुटका केली. शिवरायांनी १९व्या वर्षी प्रचंड मुत्सद्देगिरी दाखवत सिंहगड किल्ला देऊन व थोरले बंधू संभाजीराजांनी बंगळूर जहागिरीच्या किल्ल्याचा ताबा आदिल शहाला देऊन सुटका करून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६६५
मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण
दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,
“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.
या लढाईत मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य अष्टमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार बुधवार)

महाराजांसाठी रामसिंह जामीन राहीला.
औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा १३ मे रविवारी रामसिंग शंभूराजांसह बादशहाच्या दरबारी गेला व शिवाजी महाराजांना ताप आल्यामुळे ते आज दरबारी हजार राहू शकत नसल्याचे बादशहास निवेदन केले. बादशाहने शंभूराजांस सरोप्याची वस्त्रे , रत्नजडीत खंजीर व मोत्यांचा हार दिला. महाराजांच्या या वागण्यामुळे राजा जसवंतसिंह, बेगम जहांआरा, जाफरखान व दरबारातील इतर उमराव यांनी शिवाजी महाराजांच्या या उद्धट व अपमानकारक वर्तणुकीबद्दल बादशाहाकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या या अरेरावी व उन्मत वागणुकीबद्दल शिक्षेची मागणी केली. औरंगजेबाने शिवाजीला काय शिक्षा करावी मृत्यूदंड कि कैद हे ठरवण्यासाठी सिद्धी फौलादखानाला महाराजांना राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जाण्याची आज्ञा केली. रामसिंगास हि बातमी कळताच त्याने औरंगजेबास कळवले कि “बादशाहने महाराजांस मारण्याचा विचार केला आहे परंतु महाराजांना माझे वडिल मिर्झाराजांनी त्यांच्या जीविताची हमी दिली आहे व त्या वचनाच्या कौलावर महाराज येथे आले आहेत. बादशाहने पहिले मला व माझ्या मुलाला ठार मारावे नंतर महाराजांना जीवे मारावे." शिवाजी महाराजांना तत्काळ शिक्षा केल्यास मिर्झा राजे व कुंवर रामसिंग यांचा विरोध सहन करावे लागेल हे ओळखून औरंगजेबाने रामसिंगास महाराजांसाठी जमीन राहण्यास सांगितले. १५ मे मंगळवारी महाराज रामसिंगाकडे आले व त्यांनी शपथपूर्वक आपल्या चांगल्या वर्तणुकीची हमी रामसिंगास दिली. रामसिंगाने निश्चिंत होऊन जामीनपात्र औरंजेबास दिले. १६ मे बुधवार रोजी औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा दिली.

16 May, 05:50
4,700
Post image

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १२ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)

#छत्रपती_शिवरायांची_ऐतिहासिक_आग्रा_भेट
स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.

छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, होते.

औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला.
औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती...
अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले...

खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश... सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना... या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत..

साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे ही पाहणार नाही..

#शेरास_सव्वा_शेर_छत्रपती_नडले
औरंगजेब स्वत:ला आलमगीर आणि शेर म्हणवून घेत असे.

त्याला त्याच्याच दरबारात सव्वाशेरानी मात दिली तो सुवर्ण दिन...

महाराजांच वय त्यावेळी ३६ वर्ष होतं आणि शंभूराजे त्यावेळी ९ वर्षाचे होते ...

म्हणजे १ पूर्णशेर ३६ वर्षे..
व् दूसरा शेर १/४ म्हणजेच ९ वर्षे..

अशा प्रकारे स्वत:ला हिन्दुस्तान चा शेर म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राचे सव्वा शेर नडले..

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/fmo7bxiiu4M?feature=share
📜 १२ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)

किल्ले रामसेजच्या मदतीसाठी रुपाजी भोसले यांची कुमक!
किल्ले रामसेजच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी (बहुतेक किल्लेदाराचे नाव रंभाजी पवार असावे) रुपाजी भोसले नाशिकच्या आसमंतात उतरला. रुपाजी भोसलेंबरोबर मानाजी मोरेही होते. रुपाजी भोसले व मानाजी मोरेची खबर लागताच नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या गणेश गावाजवळ शहाबुद्दीन फिरोजजंग अटकाव करण्यासाठी पुढे सरसावला. मात्र हर हर महादेवाच्या घोषणा देत मराठ्यांनी शहाबुद्दीन फिरोजजंगाच्या मोगली सेनेवर इतक्या प्रखरपणे हल्ला चढवला की, मराठ्यांच्या घणाघाती हल्ल्यापुढे शहाबुद्दीन फिरोजजंगाची डाळ शिजली नाही. फिरोजजंग या जंगात पराभूत झाला. ५०० घोड्यांचा पाडाव करून मराठ्यांनी विद्युत वेगाने माघार घेतली. मराठ्यांचा हेतू साध्य झाला होता.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ मे इ.स.१७३९
दोन वर्षे चाललेली वसईची मोहीम मराठ्यांना दणकेबाज विजय मिळवून देऊन संपली. मराठ्यांनी वसईचा ताबा १२ मे १७३९ रोजी घेतला आणि वसई किल्ल्याच्या तटावरून भगवा झेंडा मोठ्या समारंभपूर्वक सुमुहूर्त पाहून तारीख २३ मे रोजी फडकाविला. पोर्तुगीज सत्ता लयास जाऊन मराठ्यांची राजसत्ता आसमंतात आल्याची जाणीव ह्या फडफडणाऱ्या झेंड्याने परिसरांतील जनमानसात रूजविली. पश्चिम किनारा व्यापार उद्योगासाठी पोर्तुगिजांच्या ताब्यात दोन शतके होता. या तहाने पोर्तुगिजांचा समुद्र काठचा अंमल नाहीसा झाला. फक्त गोवा, दीव व दमण एवढीच ठिकाणे पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिली. मराठ्यांच्या या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडकी भरली. मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हावयाची अशी शंका त्यास जाचू लागली. म्हणून त्यांनी कॅ. इंचबर्ड यास जून १७३९ त चिमाजी अप्पांच्या भेटीस पाठविले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ मे इ.स.१७४१
श्रीमंत वबाजीराव पेशव्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते. पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वीच बाजीराव पेशवे तारीख २८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले.

12 May, 04:42
2,680