काही लोक तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांवर-ध्येयांवर आणि तुमच्या धाडसीपणावर हसतील, तर काही तुमच्या चुका दाखविण्याची एकही संधी सोडणार नाहीत.
तुमच्या प्रगतीच्या प्रवासात, लोकांची 'मतं' आणि 'सल्ले' असतील. तुमच्यावर संशय, थट्टा किंवा तुम्हाला कमी लेखलं जाऊ शकतं.
कधीकधी या गोष्टी अशा लोकांकडून येतात, ज्यांना आपली खरोखर काळजी असते, परंतु जास्तीत जास्त तुम्हाला रस्त्याच्या कोण्याकोपऱ्यात तुम्हाला त्रास देणारी नालायक लोकं आढळतील.
तुमच्या स्वतःवरील विश्वासाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणारे आवाज, तुम्हाला तुमच्या निर्णयांचा दुसरा अंदाज लावायला लावतात.
पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता, तेव्हाच हे आवाज वास्तविक होतात.
जेव्हा तुम्हाला तुमच्या मार्गावर अडथळे येतात तेव्हाच हे घडतं. जेव्हा तुमची "आत्म-शंका" प्रबळ होते, तेव्हा तुम्हाला सगळं सोडून द्यावंसं वाटतं.
ही प्रगतीची लढाई, तुमच्या आत एक ज्योत प्रज्वलित करत आहे, विझण्यास नकार देणारी आग.
म्हणून या आवाजांशी लढा. जोपर्यंत अविरतपणे तुमच्या प्रगतीचा लढा चालू ठेवा.
तोपर्यंत पुढे जा, जोपर्यंत तुमची केलेली थट्टा, तुमच्यावर घेतलेली शंका, तुमच्या "लवचिकता आणि दृढनिश्चयाचा" पुरावा बनत नाही...
स्वतःला आणि जगाला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे की, तुम्ही विचार केला होता, त्यापेक्षा जास्त तुम्ही सक्षम आहात.
म्हणून, आव्हानं स्वीकारा, परत लढा द्या, तुमच्या चुकांमधून शिका आणि कोणालाही तुमच्यातील तेज-ज्योत विझवू देऊ नका...
मग ते स्वकीय असो व परकीय...!!!
- हेमंत महाकाळ