11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला..
मागील 6 वर्षात रयतचा वटवृक्ष तुमच्या सगळयांच्या साक्षीने, सहकार्याने आणि साथीने बहरतोय..
सामान्य कुटुंबातील पोरं प्रशासनात जाऊन सर्वसामान्य माणसांच्या मदतीला येतील असा आशावादी विचार घेऊन रयत पुढे जात आहे.मागील वर्षभरात प्रामाणिकपणे कष्ट करत यशाला गवसनी घालणाऱ्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या वर्षी पार पडतो आहे.
विद्यार्थी आणि त्यांच्या माय बापाच्या कष्टाचा ,त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सत्कार करणारा हा महाराष्ट्रातील "एकमेव सन्मान सोहळा" आहे.
हा 'मानाचा फेटा' घेण्यासाठी या वर्षी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी,Sub Registrar,विक्रीकर निरीक्षक Excise Inspector,कालवा निरीक्षक, ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक,कर निर्धारण अधिकारी अशी 500 हुन अधिक मंडळी येणार आहेत..
आपण ही या दिमाखदार सोहळयाला नक्की यावे ही आपल्याला मनापासून विनंती..
आपलाच,
उमेश कुदळे
कार्यकर्ता,
रयत प्रबोधिनी पुणे 🙏