आज पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आयोजित केलेल्या “कृतज्ञता सोहळा” या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष,दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहिले होते. येथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी व अधिकारी पदी निवड झालेल्या उमेदवारांनी भाऊंचा सत्कार केला व त्यांच्या कडे प्रमुख प्रलंबित मागण्या उपस्थित केल्या, पुढील आठवड्यात जेवढे महत्वाचे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी भाऊ संबंधित अधिकारी व मंत्री यांना बोलणार असल्याचे सांगितले आहे. उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आचारसंहित अगोदर जेवढे महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मार्गी लावू असे बच्चू भाऊ कडू यांनी सांगितले.